विदर्भात Akola, Chandrapur पारा पुन्हा वाढला ! पहा आजचे तापमान ?

विदर्भात Akola, Chandrapur चा पारा पुन्हा वाढला ! पहा आजचे तापमान ? आणि काय काळजी घ्यावी ?

राज्यात तापमानवाढीचा इशारा हवामान विभागाने आधिच दिलेला आहे: यामध्येच विदर्भात मार्च च्या सुरुवातीलाच Akola 42 अंश सेल्सिअसचा उच्चांक सुध्दा गाठलेला आहे. पहा आजचे तापमान किती व पुढील दिवसांमध्ये कसा राहणार उष्णतेचा पारा !

  1. विदर्भातील उष्णतेची लाट यायला सुरुवात !

मार्चच्या सुरुवातीला राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून विदर्भात याचा परिणाम म्ह्णून सुरुवातीलाच तापमानाने उच्चांक गाठला असल्याचे आपल्याला जानवत आहे. राज्यातील Akola जिल्ह्याचे temperature यामध्ये वाढताना पहायला मिळत आहे. अकोल्याचे तापमान 39 अंशावर पोहचले आहे लवकरच हे 40 पार कसेल असे तज्ञांचे मत आहे. त्यासोबतच चंद्रपुर जिल्ह्याचे तापमान देखिल जास्त प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसत आहे.

ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 42°C तापमानाची नोंद.

विदर्भातील चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये यावेळेस मार्चच्या मध्यंतरी तापमानाचा पारा सर्वाधिक वाढत आहे, तेव्हा प्रशासनाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेले आहेत त्याचे पालन करने जनतेचे कर्यव्य आहे. गेल्या 2-3 आठवड्यांपासून राज्याचे आणि विशेषता विदर्भाचे तापमान 35 ते 39°C दरम्यान आहे. तेव्हा यावर्षी तापमानाचा पारा लवकरच जास्त प्रमाणात तापनार असल्याचे बोलले जात आहे.

  1. यंदाच्या तापमानाविषयी हवामान विभागाचा अंदाज !

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यभर उन्हाचा चटका कायम राहणार असुन हा चटका आता राज्यातील लोकाना सोसावा लागनार आहे, त्यामुळे यावर करायचे तरी काय असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण होत आहे. हवामान विभागाच्या अभ्यासकानुसार विदर्भात यावर्षी उष्णतेची लाट सतत वाढात राहनार आहे. यासंदर्भात हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यामध्ये मार्च च्या सुरुवातीलाच येलो अलर्ट जारी केलेला आहे.

  1. वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाच्या काही सूचना !

प्रशासनाने वाढत्या उष्णतेसंदर्भात सामान्य लोकाना व सर्व नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी असा सल्ला दिलेला आहे. पुढील काही दिवसामध्ये तापमानामध्ये 40 पार होईल यात शंका नाही म्हणून प्रशासनाच्या सुचनेनुसार नागरीकानी दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचे टाळावे असा सल्ला दिलेला आहे तसेच नागरीकानी आपली कामे सकाळच्या दरम्यानच करुन घ्यावी असेसुध्दा शासनाने म्हटले आहे. तसेच घराबाहेर पडत असताना आपण पुरेशी पाणी प्या आणि हलके तसेच सुती कपडे परिधान करा.

  1. राज्यात तापमान वाढीची कारणे काय ?

नुकताच राज्यामध्ये होळीचा सन सम्पलेला आहे, साधारनता असे म्हटले जात होते होळी सम्पल्या नंतर तापमानामध्ये वाढ होत होती परंतू यावेळेस मात्र होळीच्या आधीच तापमानामध्ये कमालीची वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. निसर्गामध्ये होत असलेल्या हवामानातील बदलामुळे राज्यात उन्हाची लाट पहायला मिळत आहे. राज्यामध्ये जास्त प्रमाणात झालेली जंगलतोड, व त्याप्रमान खुप कमी प्रमाणामध्ये असनारी वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन होत नसल्याने व पर्यावरणासोबत नागरीकानी केलेला खेळ-खंडोबा यामुळे याचा परिणाम म्हणून जनतेला तापमानाचा तान सोसावा लागत आहे ज्याला जबाबदार जेवढ्याप्रमान येथील जनता आहे तेवढ्याच प्रमाणात येथील प्रशासन सुध्दा आहे.

  1. उष्णतेच्या लाटेसंदर्भात हवामान विभागाचा पुढील अंदाज !

राज्याचे व विशेषता विदर्भाचे तापमान पुढील काही दिवसांत 40°C च्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. राज्यातील चंद्रपुर, अकोला, नागपुर व विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तापमान यावर्षी उच्चांक गाठनार असल्याचे तज्ञानकडून बोलले जात आहे. यावेळेसे उष्णतेची लाट मार्चमध्येच 40 पार जात आहे तर उन्हाळ्याचे अजून दोन महिने बाकी असल्याने यानंतर अधिक जास्त प्रमानात उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

🔹 नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. हवामान अपडेटसाठी सतत लक्ष ठेवा!

आमच्या सर्व पेजेस ला नक्की फोलो करा ….

YouTube Subscribe Now
फेसबुक ग्रुप फेसबुक ग्रुप 
व्हाट्सएप ग्रुप व्हाट्सएप ग्रुप 
टेलिग्राम जॉईन करा
Share Chat जॉईन करा

जर तुम्ही अशी नवीन माहिती शोधत असाल तर आमच्या वेबसाइट https://deshvarta.in/  वरून दररोज अपडेट रहा. यासाठी आत्ताच आमच्या सोशल मीडिया पेजेसमध्ये सहभागी व्हा.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *